शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ.केळुस्कर यांच्या पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 21:38 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. महेश केळुस्कर यांच्या पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देडॉ. महेश केळुस्कर यांच्या पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवडकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निवड दशावतार आणि माझा आवाज या पुस्तकांची निवड

ठाणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या तृतीय वर्ष कला-मराठी अभ्यासक्र यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांच्या दोन पुस्तकांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे दशावतार व माझा आवाज या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन एकाच दिवशी ठाण्यात झाले होते. डॉ. केळुस्कर यांची पहिल्यांदा दोन्ही पुस्तके अभ्यासक्रमासाठी निवडल्याने त्यांनी ‘लोकमत’जवळ आनंद व्यक्त केला आहे. 

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०२० - २१ पासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मराठी लोकरंगभूमी या विषयासाठी दशावतार तर आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन व संवाद या विषयासाठी माझा आवाज ही दोन पुस्तके पुढील तीन वर्षासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासली जाणार आहे. अनघा प्रकाशनच्यावतीने एप्रिल २०१९ मध्ये या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला होता. डॉ. केळुस्कर यांनी दशावतार पुस्तकासाठी सहा वर्षे संशोधन केले होते. दशावतराच्या रुपात मालवणी मुलखातील लोककला पहिल्यांदाच खान्देशात अभ्यासली जाणार आहे. यात दशावतराचा प्रयोग, त्याची निरीक्षणो, कलाकाराची जीवनमूल्ये, लोककलेतून देण्यात आलेले नैतिकतेचे धडे हे सर्व यात मांडण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रादेशिक आदानप्रदान होणार असल्याचे मत डॉ. केळुसकर यांनी व्यक्त केले. संवादाच्या माध्यमांसाठी माझा आवाज हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. निवदेनाची भाषा, त्याची शैली, आवाज कितपत असावा हे सर्व यात अभ्यासपूर्ण मांडण्यात आले आहे. अनघा प्रकाशन, ठाणे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रकाशित केले हे ग्रंथ सन २०२०-२१ पासून अभ्यासक्रमात लागू असतील.

'मराठी लोकरंगभूमी' या विषयाच्या अभ्यासासाठी दशावतार (कोकणी): स्वरूप व वैशिष्ट्ये आणि लोकरंगभूमीची संकल्पना सोदाहरण विशद करणारा 'दशावतार' हा ग्रंथ विद्यार्थाना अत्यंत उपयोगी पडेल. डॉ.केळुसकर यांनी आपल्या पीएचडी संशोधनावर आधारित या ग्रंथात कोकणचा दशावतार सांगोपांग समजावून दिला आहे. त्यांचा 'माझा आवाज' हा ग्रंथ आकाशवाणीमधील त्यांच्या ३६ वर्षाच्या अनुभवावर आणि आवाजशास्त्राच्या प्रदीर्घ अभ्यासावर आधारित असून 'आधुनिक समाज  माध्यमांसाठी लेखन व संवाद' या विषयाच्या अभ्यासासाठी सुयोग्य आहार व व्यायाम,निवेदन-वृत्तनिवेदन-सूत्र संचालन, क्षेत्रीय वृत्तकथन कसे करावे वैगरे संबंधी 'माझा आवाज' मध्ये अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे.

माझ्या दोन्ही वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची निवड झाली, याचा अतिशय आनंद आहे. मी गेली ४० वर्षे लिखाण करीत असून २४ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. माझी एक मालवणी कविता नववीच्या मराठी पुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. विद्यापीठाने दिलेला हा सुखद आश्चर्याचा धक्का आहे असे डॉ. केळुस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणuniversityविद्यापीठ